Tuesday, December 1, 2015

लग्नाची भानगड?

बायको माहेरी गेल्यामुळे घर कसं शांत आहे.  अर्थात ते नेहेमीच तसं असावं असं नाही.  नुकतंच लग्न झाल्यावर बायको माहेरी गेली कि खूप साचलेली कामं असतात ती करायला हुरूप येतो.  आता एव्हढ्या वर्षांच्या संसारानंतर मात्र माझं जग जवळ जवळ बायको अन कामापर्यंत मर्यादित आहे म्हणुन खूप चुकचुकल्या सारखं वाटत यवढंच.  त्यातली एक गोष्ट चांगली कि ती नसल्यामुळे सतत ओळखीच्या लोकांच्या घटस्फोटाच्या बातम्या कानी येत नाही, नाहीतर रोजंच ती असं काही सांगायची. आणि हे घटस्फोट घेणारे काही नुकते लग्न झालेले नाहीत.  त्यांची लग्न होऊन पंचवीसएक वर्ष झालीत.  असे असंख्य आहेत. म्हणजे पूर्वीच ठरवलं तरी मुलं मोठी होवून कॉलेज मधे जाईपर्यन्त वाट बघणारी.  त्याचं वाईट वाटतं अन नवलही.  एवढ्या वर्षात कसं पटवुन घेत नाहीत?

लहानपणी मी पेपर मध्ये जाहिराती वाचायचो. “तू माझ्या लग्नाची पत्नी असून माझ्या नकळत अमके हजार रुपये अन दागिने घेवून माहेरी गेलीस.  मी घ्यायला आलो तरी मला अपमानित करून परत पाठवलं.  तेव्हा तू अमके हजार रुपये घेवून सात दिवसात परत आली नाहीस तर हीच सोडचिठ्ठी समजावी”.  एंड ऑफ स्टोरी.  पैसे अन दागिने नेल्याचे आरोप अर्थातच खोटे असतात अन तिच्याजवळ तेव्हढे पैसेही नसतात.  पण आज जे मी एकतो ते घटस्फोट पैशांपायी नसतात. त्यांची कारणे म्हणजे व्यसन, मारझोड, वैचारिक मतभेद अन प्रेम प्रकरणं वगैरे. म्हणजे हजारो वर्षापासुन जी कारणे होती तीच.  नाही म्हणायला ग्वेनेथ पाल्ट्रो चा एक नवीनच सूर आहे, काय तर म्हणे “कॉन्शस अन-कपलिंग”. आजकाल काय तर म्हणे माणसं पूर्वी पेक्षा खूप वर्ष जगतात, अन एवढे वर्ष एकाच जणाबरोबर राहणे तिला पटत नाही;  पूर्वी आयुष्यमान कमी असल्यामुळे लोकं जेमतेम वीस वर्षं सुखी संसार करु शकत होते, तिला याच आयुष्यात एकापाठोपाठ एक असे वीस-वीस वर्षांचे तीन सुखी संसार करायचे आहेत. वॉव.

घटस्फोट ही क्रीस्चन पद्धत आहे, आणि हिंदु लॉ मध्ये तसं असलं तरी हिंदु धर्मात तसं काही नाही.  लग्न हा एक संस्कार आहे आणि हिदु लग्नं तर सात जन्माची असतात.  तसा पर्याय मी स्वतः कडे ठेवत नसल्यामुळे मला वाटत मी कुणाही बरोबर आयुष्यभर संसार केला असता.  पण कुणाबरोबर जगु शकलो असतो पेक्षा कुणाशिवाय जगण्याला अर्थ नाही हे शोधून काढायचं, एकनिष्ठतेनी राहण्याची शपथ घ्यायची आणि ती पाळायची हे लग्नाचं महत्व अन म्हणुन येव्हढा खटाटोप.  

पण आता समाजाचे विचारही बदललेत, आयुष्याकढे बघण्याचा दृष्टीकोण पण बदलला, जुळवून घ्यायला मदत करणारी मोठी फेमेलीपण राहिली नाही अन डीवोर्सी म्हणून काही स्टिग्मा असा नसतो (तो नसावाच).  मदतीला काऊन्सेलिंग आहे.  वर राधा अन घनश्याम चं उदाहरण आहे कन्वीनिएन्स मेऱेज म्हणुन.   हळु हळु असे जन्मभराचे लग्न करण्याचे विचार बुर्सटपणाचे ठरवले जातील अन पुढे बहुतेक हि लग्नाची संस्थाच कोसळेल अन वेगळंच काहीतरी येईल.  सगळेच बदल चांगले असतात का?

सो सॅड.  

No comments:

Post a Comment