Saturday, November 28, 2015

नमो नमः

मागे काही महिन्यापुर्वी मला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्याचा योग आला आणि मी ते ऐकून निश्चितच प्रभावित झालो होतो. भारतात मोठ्याप्रमाणात एका पाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे घोटाळे होत असतात आणि इतिहासात कुठलाच देश त्यातुन बाहेर पडू शकला नाही. म्हणजे अगदी रोमन आणि ग्रीक सभ्यता देखील त्यामुळेच ढासळल्या. त्यामुळे भारताचही भवितव्य तसं गडबडीचं वाटत होतं. पण मोदींचं भाषण ऐकून आशा बळावली. त्यांनी दिलेली उदाहरणं खूप ऑपेरेशनल स्वरुपाची होती. जसं आधारकार्ड वापरून सरळ कन्स्यूमरलाच बँकेत सबसिडी देणे, किंवा युरियाला कडुलिंबाची ट्रीटमेन्ट देणे जेणेकरून त्याचा उपयोग केवळ शेतकऱ्यासाठी खत म्हणून करता येईल असे. ऑटोमेशन अन प्रोसेस इमप्रूवमेंटनि कदाचित पहिल्यांदाच जगात भ्रस्ताचारावर आळा घालता येईल आणि त्यात ते आणि भारत यशस्वी होवो हीच प्रार्थना.

पण मास कम्युनिकेशन मध्ये हे प्रशासन कमी पडतंय असं दिसतं. गेल्या काही आठवड्यात अनेक साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार परत केले. भारतात असहिष्णुता वाढत चालली आहे, आणि त्याचे मूळ हिंदुत्वप्रधान भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणे हे आहे असं त्याचं मत आहे. मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असेल अन वर तो राज्यपुरस्कृत वाटत असेल तर त्याविरुद्ध प्रतिसाद म्हणून साहित्यिकांनी पुढाकार घ्यायला हवा हे मला पटतं. पण नेमकं याच वेळेस त्यांनी अशी पावले उचलावीत हे थोडं दुर्दैवी वाटतं. मोदी सत्तेवर येण्याआधीही दाभोळकरांसारखे विचारवंत कार्यकर्त्यांचे खून झालेत. तेव्हा असहिष्णुता वाढत चालली आहे वा नाही ते समजून घ्यावे लागेल. या पूर्वी असे असंख्य अन्याय झालेत तेव्हा हे साहित्यिक का शांत होते ते देखील बघावे लागेल. मोदीजींनी पूर्वी साहित्यिकांना दिल्या गेलेल्या सवलती बंद केल्या त्याचा या पुरस्कार परत करण्याच्या चळवळीशी काही सम्बन्ध आहे की नाही हे ही पडताळून बघावे लागेल. पण पुरस्कार परत करणे हा निषेध व्यक्त करण्याचा शांततापूर्वक मार्ग आहे. म्हणून तो त्यांचा निर्णय दुर्दैवी असला तरी मान्य करून साहित्यिकांचा आदरपूर्वक सम्मानहि करायला हवा.

प्रश्न उरतो मोदीजींच्या प्रशासनाचा. पहिली गोष्ट म्हणजे भारतातल्या असंख्य लोकांना बिजेपी ची सत्ता नको होती. मोदिजींचीतर त्याहूनही नकोच. पण आता ते निवडुन आले अन पंतप्रधान झाले ते काही या गटांच्या लोकांना अजूनही पचवता आलं नाही. कधीच येणार नाही. त्यात वर मोदिजींना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात खचितच अन लवकरच यश मिळालं. तेव्हा व्यक्तीशः त्यांच्याविषयी कुठलाही विरोध करायला वाव नाही म्हणून असे पेर्सेप्शन बेस्ड स्टंट हे एकमेव शास्त्र विरोधाकांकडे शिल्लक आहे. कारण कुणी म्हटलं कि आम्हाला “भारतात आता सुरक्षित वाटत नाही” तर ते सुरक्षित असले तरी त्यांनी व्यक्त केलेली भीती खरीच असते अन त्याकडे दुर्लक्ष करण्या पेक्षा त्यांची भीती घालवण्याचे प्रयत्न करणं अन करत असलेलं दिसणे महत्वाचं आहे.  तेव्हा अशा गटांबद्दल हे प्रशासन सतर्क राहील आणि योग्य ती पावले उचलतील अशी मी आशा करतो. दाद्रीसारख्या प्रसंगात शांत नं बसता, किंवा त्या राज्यात आमची सत्ता नाही असं नं म्हणता मॉबच्या असल्या वागणुकीचा धिक्कार करून त्याला आळा घाणण्याची योजना आखायला हवी. तसंच मोदीजी जिंकले म्हणजे जणू कायदा आपल्या खिशात आहे असा गैरसमज करून घेणाऱ्या बीजेपी सामार्थाकांवरही जरा नियंत्रण ठेवायला हवे. मोदीजींचा मला अभिमान वाटतो आणि त्यांना देश बुलंद करता येवो हीच प्रार्थना!

No comments:

Post a Comment